ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

उत्साहाचा आणि आनंदाचा झरा – माजी आ. आनंदराव पाटील (नाना)

नईम कागदी (सामाजिक कार्यकर्ते कराड)

कोयनानगर परिसरातील सात गावांची पाटीलकी भूषविणारे कै. राघोजी पाटील यांच्या कुटुंबियांनी 365 एकर जमीन ही कोयना धरणासाठी दिली.. 1967 साली 6.6 रिश्टेल स्केल तर आज पर्यंत असंख्य भूकंपाचे धक्के पचवूनही सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कणखर खडकाने कोयना धरणाच्या भिंतीला कोणताही धक्का पोहोचू दिला नाही…

कै. राघोजी पाटील यांच्या विचारांचा आणि घराण्याचा वारसा चालवणारे माजी आमदार आनंदराव राघोजी पाटील यांनी आयुष्यातली 50 वर्ष काँग्रेससाठी वेचली.. सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकत वाढवली.. आणि ज्यांना सर्व काही मानलं, त्यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्यापर्यंत, ज्या नानांनी स्वतःच्या आयुष्याचा क्षण आणि क्षण वेचला.. त्याच आनंदराव नानांचा बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होतोय..

नाना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले परंतु त्याचबरोबर राजकारणामध्ये असंख्य धक्के ही त्यांनी पचवले.. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना खऱ्या अर्थाने आदरणीय नानांनी सातारचा गड राखला.. त्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकत वाढवली, नव्याने मोट बांधली.. दोन मोठे धक्के म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव स्वीकारून नाना त्या कोयना धरणाप्रमाणे अभेद्य राहिले.. पण त्याचबरोबर जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून कराड नगरपालिकेवर झेंडा फडकवला आणि स्वतःच्या विचाराचा नगराध्यक्ष कराड नगरपालिकेत निवडून दिला.. पण त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या.. नानांनी काँग्रेस सोडली. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यानंतर झालेला इतिहास सर्वांनी पाहिलेला आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाला, एकही जागा राखता आली नाही. सर्व बुरुज ढासळले… 2014 ते 2019 हा कालावधी नानांच्या राजकीय आयुष्यातला खडतर असेल.. विधान परिषदेवर ते आमदार झाले. परंतु, पोटात दुखणाऱ्या नेत्याच्या जवळच्या लोकांनी नेत्यांचे कान भरायला सुरुवात केली, आणि या सर्व गोष्टींना कंटाळून 2019 ला नाना वेगळे झाले.. नानांनी जर 2019 ला अतुल भोसले यांचा प्रचार केला असता तर त्याचवेळी गुलाल हा निश्चित होता.. पण त्यानंतर, 2024 ला नानांनी अतुल भोसले यांचा उघडपणे प्रचार केला आणि गुलालाचा धुरळा उडाला…..

पन्नास वर्षात असंख्य कार्यकर्ते नानांनी बघितले आणि पाहिले. तळागाळातला कार्यकर्ता त्यांनी मोठा केला. परंतु, ज्या- ज्या वेळा कार्यकर्ते विरोधात गेले, वेगवेगळ्या पक्षात गेले, त्या कार्यकर्त्यावर नाना कधीही नाराज झाले नाहीत. फुटलेला दुसऱ्या पक्षात गेलेला कार्यकर्ता नानांना कुठे ही भेटू दे.. नाना त्याच्या खां‌द्यावर हात ठेवून त्याची चौकशी करणार.. कसा आहेस, बरा आहेस का, जर तो कार्यकर्ता अडचणीत असेल तर जाताना त्याला सांगणार,, काळजी करूस नको मी आहे.. त्यामुळेच मनसे, शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट, काँग्रेस आय, आप.. तसेच कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा नानांच्या एका हाकेला धावून येतो.. हे अत्यंत दुर्मिळ असे उदाहरण फक्त कराड दक्षिणमध्ये बघायला मिळते.. नानांचा वाढदिवस असू दे. अथवा कोणताही कार्यक्रम असू दे, नानांच्या घरा जवळचा परिसर गर्दीने फुललेला असतो.. प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. नानांना भेटून एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच ताकद त्या कार्यकर्त्याला मिळते.. त्यावेळी तो कार्यकर्ता मनातल्या मनात म्हणत असतो.. नाना तुमच्यासाठी काय पण,, काल पण,, आज पण,, आणि उद्या पण…

समाजमनाची हीच ताकद हीच खरी शक्ती म्हणजे नानांची शक्ती आहे.. लोकांच्या गर्दीत कायम खुलणारे नाना म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा एक झरा आहे.. दि.19 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाच्या, आदरणीय नानांना खूप खूप शुभेच्छा…. !

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker