सत्तांतर 50 वर्षांनी : पाटणला राष्ट्रवादीला धक्का, देसाई गटाचा विजय

पाटण | उरुल विविध कार्यकारी सेवा सोसायटीत तब्बल 50 वर्षांनी संत्तातर पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनेलला यश मिळाले आहे. त्यामुळे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलचा 13/0 ने असा ऐतिहासिक पराभव झाला.
उरुल (ता.पाटण) येथील उरुल, ठोमसे, बोडकेवाडी, शितळवाडी,चरेगाव मधील शेतकरी सभासद असलेल्या उरुल विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया पूर्ण झाली. सोसायटीच्या 13 जागेपैकी 1 जागेवर विजयी पॅनेलचे संजय श्रीरंग खामकर बिनविरोध निवडुन आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात 12 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये एकुण 528 सभासदांपैकी 329 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात मते ः- सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी – देसाई चंद्रकांत पांडुरंग (166), देसाई शिवाजी जगन्नाथ (172), निकम आनंदराव दिनकर (171), निकम बाळासाहेब राजाराम (189), निकम शशिकांत मोहनराव (185), पवार सतिश शामराव (176), मोकाशी शिवाजी ज्ञानदेव (176), सुर्वे वसंत खाशाबा (170), अनुसुचित जाती/जमाती सभासद प्रतिनिधी मधुन ः- कांबळे भाऊसो निवृत्ती (181), इतर मागासवर्ग सभासद प्रतिनिधी ः- खामकर सुभाष बजरंग (180), महिला सभासद प्रतिनिधी ः- जाधव तारुबाई ज्ञानदेव (189), साळुंखे रत्नप्रभा भिमराव (185), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागासवर्ग सभासद प्रतिनिधी ः- खामकर संजय श्रीरंग हे बिनविरोध उमेदवार विजयी झाले.
पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा ग्रामविकास पॅनेल विजयी होताच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विजयाच्या घोषणा देत, फटाक्यांची आतिषबाजी,गुलालाची उधळण करत वाजत गाजत मिरवणूक काढली. सर्व पॅनेल विजयी करण्यासाठी संचालक शशिकांत निकम, सरपंच नितीन निकम, संग्राम निकम, सतिश निकम, संग्राम मोकाशी, सुनिल निकम, सर्जेराव साळुंखे, भानुदास मोकाशी, सतिश खामकर, अमर खामकर, राहुल निकम, चंद्रकांत देसाई, अनिल मोकाशी, आप्पासो मोकाशी, चंद्रकांत सुर्वे, मदन निकम, चंद्रकांत निकम, राजेंद्र देसाई, संदेश मोकाशी, दादासो देसाई, अरुण पवार, विजय पाटील, डाॅ. आण्णासो देसाई, सुभाष देसाई, महेश माने, सरपंच राजु कदम, शंकर माने, बजरंग माने, महेश निकम, निवास निकम, धैर्यशिल कांबळे, सुरेश दाभाडे, विजय सुर्वे, तानाजी साळुंखे, राहुल साळुंखे, रतन फडतरे, भाऊसो देसाई, बापुराव मोकाशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले. यावेळी मल्हारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद गुरव यांनी कामकाज पाहिले.