
मुंबई | मुंबई- पुणे महामार्गावर आज दोन तासांचा विशेष ब्लाॅक असणार आहे. त्यामुळे आज दुपारी 12 ते 2 यावेळेत वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. आयटीएमस प्रणालीच्या कामासाठी विशेष ब्लाॅक करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यावर ही वाहतूक थांबवली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीकडून देण्यात आली आहे.
आयटीएमस प्रणालीच्या कामामुळे हलकी वाहने जुन्या मुंबई मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लाॅकमध्ये मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक बंद राहणार आहे. तर पुण्याहून- मुंबईला जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या ब्लाॅकमुळे मुंबईहून पुण्याला येणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतून निघणाऱ्या प्रवांशी तसेच मालवाहतूक वाहनांसाठी या वेळेत मेगाब्लाॅक होवू शकतो. या बातमीमुळे आता सकाळी 10 नंतर पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN
आयटीएमएस प्रणालीमुळे संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली
मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या 94 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 हजार वाहने धावतात. या रस्त्यावर वेगाची मर्यादाही निश्चित करण्यात आली असून कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. ही यंत्रणा उभारण्यासाठी 160 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रणालीमुळे वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापित होऊन अपघात तर टळतीलच, शिवाय अचूक टोलवसुली करणेही सोपे होणार आहे. संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली असेल. वाहनांचा वेग तपासण्यासाठी सरासरी स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम 39 ठिकाणी बसवण्यात येणार आहे.