अतिक्रमण हटाव : वर्धनगडावर दर्गा परिसरात पोलिस बंदोबस्तात मोहिम

सातारा । वर्धनगड किल्ल्यावरील दर्गा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम आज पहाटे पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकान्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. आज पहाटेपासूनच पोलिसांच्या गाड्या वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यासह गडावर रवाना होत होते. गडाच्या पायथ्यापासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवकालीन असलेला दर्गा काही समाजकंटकांनी काही दिवसापूर्वी ती पाडली होती. तशा पद्धतीचे निवेदन वर्धनगड ग्रामस्थ व मुस्लिम समाजाकडून जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात आले होते. त्यानंतर ती दर्गा ग्रामस्थांच्या व मुस्लिम समाजाच्या लोकवर्गणीने बांधण्यात आली होती. परंतु बांधते वेळी या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे मनसेचे कार्यकर्ते यांनी वनविभागाला कळवून हे वाढीव अतिक्रमण काढावे अन्यथा हनुमान मंदिराला परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यास अनुसरून कागदपत्रानुसार त्या ठिकाणी असलेले कबर सोडून झालेले अतिक्रमण आज पोलीस प्रशासनाच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वनविभागाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.
या अतिक्रमण काढतेवेळी कुठल्याही प्रसार माध्यमांना गडावरती जाऊ देत नव्हते. कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही सामाजिक वाद घडू नये या दृष्टीने गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पोलिसांनी बंद केल्या होत्या. आज मंगळवार असून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकासाठी वर्धनगड पायथ्याशी दर्शन घेऊन आपला विधी असेल तो पायथ्याशी करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. याठिकाणी दर्गा सोडून सभोवतालचं जे अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण वनविभाग व पोलिसांच्या मदतीने आज काढण्यात आले असल्याच बोललं जात आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती कोणत्याही प्रसार माध्यमांना वरती जाण्यास मज्जाव करण्यात येत होता एकूणच ही अतिक्रमण वर्धनगड ग्रामस्थांनी काढण्याचं पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांना आवाहन केलं होतं.



