प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ कृती म्हणजे ढोंगीपणा : छ. उदयनराजे भोसले

सातारा | छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करायला जो व्यक्ती आला, तिथे जावून पाया पडून साष्टांग नमस्कार घालत असतील, तर ते कुठल्या हिशोबात मोडत. फोटो व्हाट्सअपला फिरवणं, चुकीच आहे. अशांना काही बोलायचं. एका बाजूला शिवाजी महाराजांना महान म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेब बाबत बोलायचं याला हिपोक्रोसी (दांभिकपणा- ढोंगीपणा) म्हणायचं तर काय म्हणायचं. औरंगजेबाचे उदातीकरण का, तो एवढा महान नव्हता, असेही छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या कृतीवर आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे. छ. उदयनराजे म्हणाले, आज ना उद्या समीकरण बदलणारं. काळ फार लांब नाही. मी एवढीच प्रार्थना करतो हा देश एकत्रित रहावा.
नक्की काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? असे प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरुन शिवप्रेमींच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीला वाकून फुले वाहतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर चादर देखील चढवली आहे.