पाणी देता का पाणी : सावित्रीबाईच्या नायगावकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगाव मध्ये (ता. खंडाळा) अस्वच्छ पाणी, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून दि. 21 नोव्हेंबर पासून 2 हजार ग्रामस्थांसह उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजकीय हेव्यादाव्यातून गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होत नसून पाणी योजनेत अडकाठी आणल्याचा आरोप निवेदन देणाऱ्या नागरिकांनी केला आहे. जलसंधारण योजनेतून नायगाव गावासाठी 1 कोटी 82 लाखांची पाणी योजना उपलब्ध करून दिली आहे. परंतु, या गावात पिण्याची पाण्याची भीषण अवस्था आहे.
स्त्री शिक्षणाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म गाव असणाऱ्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील घरांमध्ये अस्वच्छ पिण्याचे पाणी येत आहे. दरम्यान, गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सगळ्या परवानग्या घेऊन देखील राजकीय स्वार्थापोटी नायगाव गावचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी नायगाव ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नायगावचा प्राणी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात आला नाही तर 21 नोव्हेंबर रोजी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासमोर म्हणून उपोषण करणार असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तेव्हा आता प्रशासन नायगावचा पाणी प्रश्न सोडवणार का? गावातील योजनेत राजकीय हेवेदावे आणत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामध्ये प्रशासनाला लक्ष घालून गावाला स्वच्छ पाणीपुरवठा मिळवून द्यावा.