मसूरच्या श्री शिवाजी विद्यालयाच्या SSC च्या सवंगड्याचा स्नेहमेळावा

मसूर प्रतिनिधी । गजानन गिरी
तब्बल 40 वर्षांनी मसूरच्या श्री शिवाजी विद्यालयातील 1983 मधील दहावीच्या बॅचचे एकत्र आलेले शाळेतील सवंगडी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत. गप्पा रंगवत चांगलेच रमले. शाळेतल्या चांगल्या व कटू आठवणी मांडायलाही सवंगडी कमी पडले नाहीत. हास्याच्या फवाऱ्यात मन मोकळेपणाच्या गप्पा एका भाव विश्वातच रमला गेल्या. शालेय जीवनात काढलेल्या एकमेकांच्या खोड्याही समोर आणल्या गेल्या. शिक्षकांच्या आठवणीही पटलावर आल्या. या गुरुजनांच्या ज्ञानदानामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात विराजमान झाल्याचे अनेकांनी कथन केले. आपापल्या कुटुंबाचा आलेखही मांडला गेला. आता फक्त स्वतःची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी आवर्जून करण्यात आले. हे सर्व स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनुभवास मिळाले.
श्री शिवाजी विद्यालयातील 1983 मधील बॅचचे विद्यार्थी- विद्यार्थिनीचा सवंगडी नावाचा मोबाईल वरचा व्हाट्सअप ग्रुप आहे. बऱ्याच दिवसापासून हे सवंगडी सर्वजण व्हाट्सअपद्वारे एकमेकांच्या संवादात होते. मात्र अनेक जणांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. या सवंगड्यांना एकत्रित आणण्याच्या विचारातून कराड तालुक्यातील बेलदरेनजीक `आपले गाव` नावाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी स्नेहसंमेलनाचे आयोजन उस्फूर्तपणे करण्यात आले. पुढील वर्षी 28 जानेवारीला पुन्हा एकत्रित येण्याचं आश्वासन देत संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाच्या समारोप प्रसंगी आठवण म्हणून प्रत्येकाला सन्मानचिन्ह देण्यात आले.
संमेलनाचे नियोजन राजेश शहा, अभय कुलकर्णी यांनी केले. मनीषा शहा, सुचिता शहा, सत्यभामा कांबिरे, उज्वला पोळ, जया कांबिरे, प्रमिला पाटील, कल्पना खोत, तिलोतमा लंगडे, अक्काताई पाटील, रोहिणी आफळे, अविनाश शेटे, सुहास शेजवळ, संभाजी कांबिरे, विजय जगताप, बसवेश्वर चेणगे, दिनकर बर्गे, महादेव शेलार, शहजादे पिरजादे, काकासाहेब बाकले, सुनील आफळे, जयवंत जगदाळे, लालासाहेब पाटील, नरेंद्र स्वामी, भीमराव जाधव, बाळकृष्ण घुटुकडे, गजानन गिरी या सर्वांनी स्नेहसंमेलनात संवाद साधला.