अजित पावारांचा इशाराच शरद पवारांसह विरोधकांना म्हणाले… चला दूध का दूध पाणी करू

मुंबई | आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये समितीत होतो. मात्र, त्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांनीच घेतली पाहिजे. मी आणि एकनाथ शिंदे सदस्य होतो, त्यामुळे जबाबदारी आमची नाही. काहीजण खुशाल सांगतायत वरून आदेश आलेत, वरून आदेश आलेत सिध्द केले तर आम्ही म्हणेल ते ऐकू. कारण नसताना समाजात अस्वस्थता निर्माण करण्यात येत आहे. विरोधकांकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. तसेच लाठीचार्ज बाबत आमच्यापैकी तिघांनी कोणी आदेश दिले असतील तर आम्ही राजकारणातून बाजूला होवू आणि त्यांनी आदेश कोणी दिल्याचे सिद्ध केलं नाही तर राजकारणातून त्यांनी बाजूला व्हावं आहे का हिम्मत, असा थेट हल्लाबोल शरद पवारांसह विरोधकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. जालना येथील लाठीमारून पत्रकारांनी प्रश्न विचारताच पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारला चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून सुरू आहे. गेल्या सरकारमध्ये उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते, काल जालन्याला गळा काढायला गेले होते. तेच मराठा समाजाचा गळा घोटणारे आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात कोणीही राजकीय पोळी भाजू नये.
फडणवीस सरकारचा भरला घडा, अजित पवार बाहेर पडा घोषणा
बारामतीत मराठा सकल समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बाहेर पडा, बाहेर पडा अजित पवार बाहेर पडा. फडणवीस सरकारचा भरला घडा, अजित पवार बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. यावर अजित पवार आक्रमक झाले होते, ते म्हणाले तो काय सरपंच किंवा पदाधिकारी नाही. कोणीही म्हणेल, त्याच आम्ही ऐकायचं असा उलट प्रश्न केला आहे.