कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसांगलीसातारा

मंत्री शंभूराजेंच्या मध्यस्थीनंतरही धरणग्रस्तांच्या आंदोलनाला स्थगिती नाहीच : केवळ महिनाभर सुट्टी

पाटण | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक महिन्यात मिटींग लावून धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा निपटारा करू, अशी ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्यानंतरही आज आंदोलनाला स्थगिती दिली नाही. सकारात्मक चर्चेनंतर आजपासून आंदोलन स्थगित होईल, अशी आशा होती. परंतु डाॅ. भारत पाटणकर व आंदोलक यांच्यातील चर्चेतून आंदोलनाला स्थगिती न देता केवळ एक महिन्यासाठी सुट्टी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगिती किंवा मागे घेतले जाणार नाही.

Shree Furniture karad

कोयनानगर (ता. पाटण) येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन गेल्या 30 दिवसापासून सुरू आहे. काल मंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन धरणग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी सकारात्मक चर्चा होवून पुढील दिशा ठरविण्यात आली. मंत्री शंभूराज देसाई यांनी आजपासून आंदोलन स्थगित होईल, अशी आशा व्यक्त केली होती. परंतु आंदोलकांनी स्थगिती न देता केवळ येणाऱ्या 27 एप्रिलपर्यंत सुट्टी घेतली आहे.

सरकारने येत्या महिनाभरात बैठक न लावल्यास तसेच धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्याविषयी सकारात्मक चर्चा न झाल्यास 5 लाख प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थित बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले जाणार आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांनी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांना लेखी पत्रही बैठकीचे दिले आहे. परंतु आंदोलकांनी माघार न घेता केवळ सुट्टी घेतली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker