ठाणेताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रमुंबईराजकियराज्यसातारा

Video पालकमंत्री शंभूराज देसाई हरविले आहेत : बॅनर झळकले

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी आणि शिवसेना- भाजप युतीतील नेत्याच्यांत राजकारण तापलेले असते. दररोज नवनविन विषय घेवून एकमेकांवर तोंडसुख घेतलेले दिसते. यात मनसेकडून कधी भाजपची, कधी शिंदे गटाची बाजू घेवून महाविकास आघाडीला टार्गेट केले जाते. परंतु साताऱ्याचे पालकमंत्री व पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे चक्क मनसेकडून ठाण्याचे पालकमंत्री हरविले असल्याचे बॅंनर झळकत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटातील मंत्री देसाई आणि मनसे आमनेसामने आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरचेही वातावरण प्रचंड तापले आहे.

Kota Academy Karad

मीरा-भाईंदरमध्ये अनेक गुन्हे घडूनसुद्धा पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का? हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे असा सवाल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सरकारला करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मीरी-भाईंदर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावर नागरिक नाराज असल्याचे म्हणत पालकमंत्र्यांचे याकडे का लक्ष नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे तसेच आपण यांना पाहिलात का असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या फोटोसह आणि नावाने जोरदार बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावरही नागरिक नाराजी व्यक्त करत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker