कराडच्या ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यार्थ्यांचे NEET परीक्षेत उत्तुंग यश

कराड | राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी (Brilliant Academy) ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत अतिशय उत्तुंग यश संपादित केले आहे.
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी (फक्त कराड येथील एकाच शाखेतून) पुढील प्रमाणे अतिशय घवघवीत यश संपादित केले आहे. आयेशा पाटील 690 मार्क्स मिळवून कराड तालुका टॉपर झाली असून ए आय आय एम एस मध्ये एम बी बी एस प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. देवांक भिसे याला 560 मार्क्स मिळाले असून एस सी प्रवर्गातून एम बी बी एस प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. श्रीदत्त बोईर याला 424 मार्क्स मिळाले असून तो एस टी प्रवर्गातून एम बी बी एस प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. वैष्णवी नलावडे हिला 388 मार्क्स मिळाले असून ती आर्मी कोट्यातून एम बी बी एस प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.
नीट साठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्टाफ, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी 11 वी पासूनच नियमित अध्यापन दररोज चालणारा 5 ते 6 तास स्टडी व डाउट सेशन, नियमित टेस्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या ई. मुळे केवळ ब्रिलियंट चे विद्यार्थी एवढे उत्तुंग यश संपादित करू शकत आहेत. बायोलॉजी विषयाच्या अध्यापनासाठी तज्ज्ञ अद्यापक स्मार्ट बोर्ड द्वारे अध्यापन करत आहेत. केमेस्ट्री व फिजिक्स विषयाच्या अद्यापनासाठी आय आय टी एन अद्यापक
अध्यापन करत आहेत.
या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खात्रीशीर पायाभरणीसाठी 8 वी ते 10 वी ब्रिलियंट पब्लिक स्कूल, कराड ची सुरुवात झाली असून पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद असून मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत, तसेच 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट विकेंड फाऊंडेशनची सोय देखील आहे. नीट व जेईई मेन ॲडव्हान्सड च्या तयारीसाठी रिपीटर वर्गाची सोय या ठिकाणी आहे. लवकरच कॉलेज व स्कूल चे स्वतः च्या जागेत स्थलांतर होत आहे 8 वी ते 12 वी च्या वर्गासाठी प्रवेश सुरु असून पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, निकालाची परंपरा हमखास असणाऱ्या जिल्ह्यातील या अकॅडमी, पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.