Satara News : ट्राॅली कॅनाॅलमध्ये पलटी झाल्याने 4 शेतकरी महिला ठार

सातारा | कारंडवाडी (ता. सातारा) येथे शेतातील कामे आटपून ट्रॉलीतून घरी निघालेल्या शेतकरी महिलांची ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली कॅनाॅलमध्ये पलटी झाल्याची घटना घडली आहे. ट्रॉलीमध्ये बसलेल्या पाच महिलांपैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉली खाली अडकून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा एमआयडीसी भागातील कारंडवाडी हद्दीतील महाडिक कॉलनी परिसरातून कॅनाल वरून जाताना एक ट्रॉली पलटी होऊन चार महिला मृत्युमुखी पडल्या. कॅनाॅल वरील अरुंद पुलावरून जात असताना कारंडवाडी येथे शनिवारी (दि. 24) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
ट्राॅली कॅनाॅलमध्ये पडल्याने अलका भरत माने (वय- 55), अरुणा शंकर साळुंखे (वय- 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय- 65), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय- 60, सर्व रा. कारंडवाडी) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नांवे आहेत. शेतातून घरी परतताना ही दुर्घटना झाली आहे.