जरंडेश्वर साखर कारखान्यावर स्वाभिमानीचा हल्लाबोल : ऊसदरांचा प्रश्न आठवड्यात सुटणार

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साखर कारखान्यांनी उसाला यंदाच्या गाळपं हंगामामध्ये पहिली उचल साडेतीन हजार रुपये आणि गेल्या हंगामातील पाचशे रुपये द्यावेत, या मागणीसाठी सातत्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन चालू केलेली आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उसाची कोंडी फोडण्यासाठी एकमेकाकडे बोट दाखवत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पक्षाचे वैतागून गेले होते. वारंवार विनंती आणि निवेदन देऊन सुद्धा कारखानदार बघायला तयार नव्हते. त्यामुळे आज जरडेश्वर साखर कारखान्यावर ऊस वाहतूक रोको करणेत आला. रस्ता रोको होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुठले पदाधिकारी ऐकायला तयार नव्हते. आंदोलन होऊ नये म्हणून बैठक निष्फळ झाल्यानंतर स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच जरंडेश्वर साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली. स्वाभिमानीचे पदाधिकारी अक्षरशः हात जोडून वाहन चालकांना विनंती करत होते आणि एका बाजूला ऊस वाहतुकीची वाहने लावायला सांगत होते. त्या विनंतीला मान देऊन वाहनधारकांनी रस्त्याच्या एका बाजूला वाहने लावली. त्यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तब्बल सात किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या. शेवटी पोलीस प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनातले अधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सातारा- पंढरपूर मार्गावर जवळपास पाच तास ऊस वाहतूक रोखल्यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी सहृदयतेने बैल वाहतूक मात्र सुरळीत चालू ठेवली. त्यामुळे उपस्थित लोकांनी संघटनेच्या या आंदोलनाचे कौतुक केलं. जरंडेश्वर साखर कारखान्यावर आंदोलन म्हटलं की आतापर्यंत पंधरा मिनिटांच्या पुढे होऊ देत नव्हते. मात्र तब्बल पाच तास आंदोलन यशस्वी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कोंडी फोडताना साखर कारखाना काय दर देतोय हे पाहून आम्ही दर देऊ भूमिका सगळेच कारखानदार खाजगीत सांगत होते. त्यामुळे संघटनेने साखर कारखान्यावर हल्लाबोल केला आणि दर जाहीर करण्याची मागणी केली. मात्र व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चर्चा करून 30 तारखेच्या आत दर देण्याचा जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
जरंडेश्वर परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा मुद्दा ही उपस्थित करत स्वाभिमानीला या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याच आवाहन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोजगार आंदोलनाचा मिटलं की प्रदूषणासंदर्भात आंदोलन उभा करण्याचा आश्वासन राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिलं.