कोयनेत पुन्हा पावसाचा जोर वाढला : बलकवडी धरणातून पाणी सोडल्याने सतर्कतेचा इशारा

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात अजून पावसाचा जोर सर्वत्र पहायला मिळत नसला तरी कोयना धरणात गेल्या 24 तासात जोर वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 3.4 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 46. 54 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना परिसरात जोर वाढला असून सध्या धरणात प्रतिसेंकद 40 हजार 574 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. तर बलकवडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयनेत 46. 54 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 46. 54 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या 24 तासात कोयनेला- 158 मिलीमीटर, नवजा- 183 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 141 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 1915, नवजा- 2654 आणि महाबळेश्वरला- 2589 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
बलकवडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदी काठच्या गावांना इशारा
धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून धरणा मध्ये पाण्याची आवक वाढत आहे. दि २२ जुलै रोजी 2000 क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात मध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच धरणामध्ये दरम्यान पाण्याची आवकमध्ये वाढ होत असल्याने नियोजित वेळेपुर्वी देखील आगाऊ सूचना देऊन पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे बलकवडी धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये. तसेच त्यांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.
शनिवारी दिवसभरातील पावासाची अपडेट
– भिलार गावातील विशाल शिवाजी पिलावरे यांच्या घरावर मोठे झाड पडुन त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
– घावरी ते येरणे रस्ता दरड बाजूला करून मोकळा करण्यात आला तालुका महाबळेश्वर
– रात्री महाबळेश्वर तालुक्यातील घावरी ते एरणे या रस्त्यावर दरड कोसळली होती. ती प्रशासनाने तात्काळ हटवून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला आहे.