कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसांगलीसातारा
‘कृष्णा’कडून ६५ व्या हंगामात १२ लाख ३९ हजार मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप

रेठरे :- शिवनगर येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. या हंगामात कृष्णा कारखान्याने १२ लाख ३९ हजार मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे. कृष्णा कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, धोंडीराम जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक पंडित पाटील, मनोज पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, वाळवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब पाटील, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक करताना कारखान्याचे सेक्रेटरी सिद्धेश्वर शीलवंत यांनी गळीत हंगामाचा आढावा सादर केला. प्रारंभी जे. डी.मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमित्रा मोरे यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी ऊसतोडणी वाहतूकदार, शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी सभासद, ऊसतोडणी वाहतूकदार, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले.