मराठे 70 वर्षे गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते? : सदाभाऊ खोतांची टीका

कराड | प्रस्तापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते का? की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही. आताच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलन कशी सुरु तर आंदोलनं फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाची हत्यार वापरली जात असल्याचा आरोप रयत क्रांतीचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.
कराड येथे नगरपालिके जवळील आंदोलनाला भेट दिल्यानंतर सदाभाऊ खोत बोलत होते. ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने कोणीही मुळाशी जात नाही. फडणवीसांनी दिलेले आरक्षण टाकले होते, आघाडी सरकारने योग्य भुमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे असुन संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल, अशी मागणी केली.
मराठ्याच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत्या सदाभाऊ खोत
मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालातरांने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेला मराठा समाजचं पोर नोकरीसाठी बाहेर पडलं. तेव्हा मराठा समाजाच्या पोरांच्या लक्षात आलं 100 मार्क मिळवूनही 50 मार्काचा पोरंगा पुढं जातो, अन् आपण माग राहतो. तेव्हा मराठा शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती होत्या, अन् शाळा शिकलो तरी माती होत्या. त्यामुळे आता मराठा समाजाचा, शेतकऱ्याचा पोरंगा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.