भाजपाच्या लोकांनी सांगितले बाबरीचा ढाचा पाडायला शिवसैनिक होते : अंबादास दानवे

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेव म्हणत होते. यामध्ये माझा शिवसैनिक असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यावेळी सुध्दा भाजपाच्या लोकांनी शिवसैनिक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेला या गोष्टी भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कारसेवक कोण होते. शिवसैनिक होते की नाही हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
सातारा येथे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आले होते. सातारा जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे आज चर्चा झाली. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे- पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनवडे, दत्तात्रय नलावडे, अमोल आवळे, तालुकाप्रमुख विकास नाळे, सचिन झांझुर्ने व युवासेना जिल्हाधिकारी माऊली पिसाळ उपस्थित होते.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, तुम्हाला कारसेवक होता की नाही यांचे पुरावे सादर करावे लागत आहेत, यातच सर्व आले आहे. ज्याच्या विषयी मनात शंका निर्माण होते, जो असेल -नसेल असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना पुरावे सादर करावे लागतात त्याच्यातच आमचं यश आहे. राममंदिर बाबतीतचा महाराष्ट्र नव्हे देशाचा आणि जगाचा इतिहास आहे. बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण होत कुणी शेपूट घातलं होत.
शिवसेनेचा आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा
सरकारने मराठा समाजाला वारंवार तारखा दिल्या आहेत. त्यामुळे पाटील यांची मागणी मान्य झाली पाहिजे. यासाठी बरेच मार्ग आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी छ. शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. परंतु, महाराष्ट्रातल्या सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा सरकार यांना ही मागणी पूर्ण करायचे आहे की नाही की समाजा समाजामध्ये भांडणे लावायचे आहेत. हा प्रश्न सर्वांचा मनात निर्माण होत आहे. मराठा आरक्षणाच्या भूमिकेला शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला असल्याचेही विरोधी पक्षनेते म्हणाले.