Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

अन्यथा येणारी विधानसभा निवडणूक लढणार नाही : आ. जयकुमार गोरेंचा निर्धार

सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
माण- खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचंय. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून 95 गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील 16 गावांचे जिहे कठापूरमधून काम सुरू आहे. कुकुडवाडसह 44 गावांसाठी लवकरच सुप्रमा घेऊन त्याही गावांचा पाणी प्रश्न सोडवतोय. या 21 गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्धार आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

Gurukripa Jewellers kale

बिजवडी येथे उत्तर माणमधील 21 गावांना जिहे कठापूरचे पाणी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा घेण्यात आला होता, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयकुमार गोरे यांच्यावरती जेसीबीने फुलांची उधळण करत सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ जगदाळे, उद्योजक संजय गांधी, दहिवडी नगरसेवक अतुल जाधव, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष किसनशेठ सस्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, राजाराम बापू बोराटे, सरपंच अरुण सावंत, विठ्ठल भोसले, भाजपा सरचिटणीस काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, 2019 मध्ये आंधळी धरणातून उचलून या भागाला पाणी देणार, हा शब्द दिला होता. या योजनेचे भूमिपूजन करून कामही सुरू करून दाखवलेय. जुलै महिन्यापर्यंत हिंगणीला पाणी जातेय. या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन योजना मंजूर केली. ही योजना अंदाजे साडेपाचशे ते पावणेसहाशे कोटी रुपयांची आहे. सतत लबाडाच्या संगतीत राहणाऱ्यांना लबाडीच दिसणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना दिला. मामूशेठ वीरकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. ऋषिकेश भोसले यांनी आभार मानले.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close