मुख्यमंत्री सन्मान योजना : शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ दिवशी येणार पैसै

हॅलो न्यूज | प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेनंतर आता मुख्यमंत्री सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करण्यात आल्याने आगामी 10 ते 15 दिवसात मुख्यमंत्री सन्मान निधी तुमच्या खात्यावर जमा होवू शकतो. तेव्हा कोणा- कोणाला व कशा पध्दतीने या योजनेचा लाभ मिळणार हेही आता जाहीर झाले आहे. त्यामुळे राज्यातील 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे 1 हजार 600 कोटी दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सन्मान निधी मिळण्यासाठी काही अटी आहेत. त्यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री सन्मान निधी या योजनेचा लाभ आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल पासून मिळणार आहे. एकाच सातबारा उताऱ्यावरील कुटुंबप्रमुख त्याची पत्नी व 18 वर्षांखालील दोन अपत्य, असे कुटुंब ग्राह्य असल्यास त्यांना प्रत्येकी 2,000 रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत. वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 हजारांप्रमाणे म्हणजे वर्षाला 6,000 हजार रुपये दिले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या योजनेचे निकष मुख्यमंत्री योजनेसाठी लागू असणार आहेत. मुख्यमंत्री निधी योजनेसाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, पण जमीन लागवडीयोग्य असणे, बंधनकारक आहे. पण त्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधारलिंक केलेले नाही. तसेच त्यांच्या नावावरील एकूण मालमत्तेची माहिती महसूल विभागाला दिलेली नसल्यास, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना ठराविक दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्या मुदती च्या अगोदर प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना योजनेची गरज नाही, असे ग्राह्य धरून ते अपा ठरवण्यात येऊ शकतात.